Game

असा कसा मी.... वेगळा, वेगळा

Friday, 10 November 2017

अर्धी स्वप्नपुर्ती : साल्हेर

                     "गणपती बाप्पा मोरया" "दुर्गा मात की जय" "दिन दिन दिवाळी,गायी म्हशी ओवाळी" अस सगळ करण्यात दोन अडीच महिने कसे निघून गेले ते कळलेच नाही, दुकानातील पाडवा पूजन केल, घरातील (साजूक तुपातील) फराळावर ताव मारला, घरच्यांसोबत गप्पा मारताना कसे कोण जाणे पण काकांनी माझ्या बोम्बलत हिंडण्याचा विषय काढला, आणी परत तेच नेहमीप्रमाने टोमणे सुरु झाले, कशाला हिंडतो, कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, आणी आता तुझ लग्न झालाय, वगैरे.... वगैरे..... त्याना सगळ पुरान परत समाजवून सांगितलं, ते त्यांचा हेका सोडत नव्हते आणी मी माझा मुद्दा, असो, आमची वादावादी काही संपेना, आजी ने मधेच इतर विषय काढून या वादावर तात्पुरता पडदा टाकला, आणी माझ्या डोक्यात किडा वळवळला,
                        गुलाबी थंडीची सुरुवात होताच होती, म्हंटल यंदा बागलाण भटकंतीचा श्री गणेशा करुया, म्हणून अनेक दिवसाची इच्छा असलेला साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा ही जोडगोळी मनोमन निश्चित केली, आणी DJ ला Whatsaap करून रिकामा झालो, त्याच्या रिप्लाय ची वाट बघत होते, रिप्लाय नाही पण  संध्याकाळी DJ महाशय स्वत: हजर झाले, चेहऱ्यावरून अंदाज आला नाही, म्हंटल काय ते तोंडाने बोल, सलग सुट्ट्यांमुळे काही व्यावसायिक अडचणी होत्या, आणी नेहमीप्रमाणे इतर मंडळीनी टांग दिली होती, म्हणून हा जोडगोळी चा प्लान अर्धा - अर्धा करावा किंवा पुढे ढकलावा, अस मत आल, प्लान पुढे ढकलण शक्य नाही, हे एकमताने मंजुर केल आणी हा जोडगोळीचा प्लान आत्ता अर्धा करायचा ठरल, नेहमीप्रमाणे रात्री निघायच, निम्मेअधिक अंतर पार करुन विश्रांती घ्यायची आणि नव्या दमाने पुढील अंतर कापायचे असे निश्चीत झाले, आणि शुक्रवारी रात्री ११ वाजता गाडीला चावी दिली, कुडकुडनार्या थंडीत गाडी चालवणे हे मला नेहमीच मजेशीर वाटते, पण DJ ने काही गाडी माझ्या वाटयाला येवुन दिली नाही, साधारण दोन वाजण्याच्या सुमारास सिन्नर मध्ये आलो, क्षणभर विश्रांती साथी बस स्टॅंड वर गेलो, पण स्थानिक भिकार्यानी जवळ जवळ संपुर्ण बस स्टॅंड बुकिंग केलेल होत, म्हणुन इतर ठिकाण शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा नेहमीच ठिकाण बघितल आणि अंग टाकल ते पहाटे ५:३० पर्यंत, थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, त्यात गाडी माझ्या हाती आली, मग नाशिक मार्गे काही तासातच गाडी सालवान  गावात आली, प्रत्येक किमी नुसार लहान होणारी गावे लक्षात घेता इथेच पोटपुजा उरकावी म्हणून गाडी बाजूला घेतली, एक दोन हॉटेल मध्ये विचारपूस केली त्यातील एकाचे उत्तर, "कांदा भजी आहे, मिसळ कालच संपली" असो, तर इथेच कसाबसा नाश्त्याचा प्रश्न मार्गी लावला सोबतच पाण्याचा मजबुत साठा करुन घेतला, आणि गाडी वाघाम्बे कडे वळवली, गावात पोहोचल्यानंतर आम्ही काही बोलण्याच्या आधीच काही चाणाक्ष मंडळीनी ओळखल की आम्ही साल्हेर किल्ल्यावर जायला आलोय, त्यानी स्वत:हुन गाडी लावायची जागा दाखविली सोबत किल्ल्यावर जाणारी (मळलेली) वाटही दावली,
                          मंदिराला वळसा घालुन थोडे चालत गेल्यावर लगेच एक ओढा लागला, मजबुत थंडी असुन पण त्या गार पाण्याने हात- पाय धुवुन फ्रेश झालो, आणि किल्ल्याकडे मार्गस्थ झालो, अर्धातास चढण पर्यत गावातले कोण ना कोण सोबत होतच, त्यानंतर आम्ही दोघेच..... चालतोय, चालतोय, चालतोय पण खिंड काही येइना, दमलो बुवा म्हणत दगडावर बसकन मांडली, थोडा आढावा घेतला, किल्यावर जळनासाठी सरपण मिळनार नाही हे काही मित्रांकरवी ठावुक होत म्हणुन त्याचे तजविज जाता जाताच करावी लागणार होती, त्यानुसार हालचाल करायला सुरुवात केली, एका पिशवीत लहानसहान लाकडे, जणावरांच पडलेल (वाळलेल) शेण, अस काही गोष्टी गोळा करत करत पुढची वाटचाल चालु ठेवली, दुर सालोटा कडे नजर टाकली तर ५-६ माणसे दिसत होती, जरा बर वाटल, कोणीतरी सोबत असल्याच समाधान झाल, पण ते जास्त काळ टिकल नाही कारण ते एक गुजराथी कुटुंब होत जे काल किल्ल्यावर मुक्कामी होत आणि आज परतीच्या वाटेला लागल होत, मन पुन्हा एकाकी पडल, पण वाटचाल चालुच होती, वाटेत कोठेही म्हणावी अशी सावली नव्हती, खिंड जवळ येताना दिसत होती, आणी रस्ता खुपच निमुळता होत होता, पायातले ब्य्रांडेड बुट सुद्धा ग्रिप घेत नव्हते, जास्तीचा आगावुपणा नको म्हनुन पायतले बुट काढुण काही काळ तो रस्ता अनवानी पार केला, दमत भागत का होइना पण २ वाजता खिंड गाठलीच, सकाळची कांदाभजी संपुन पोटाची गाडी केंव्हाच रिझर्व ला लागली होती, दोन - तीन तासाच्या खड्या चढाई मुळे ह्रदय नावाच इंजिन पण धड- धड करत होत, पायातले बुट नावाचे टायर पण बऱ्यापैकी तापले होते, आणि खिंडीत गेल्यावर थोडी का होइना सावली मिळेल ही आशा सुद्धा सपशेल फेल गेली होती, खिंडीत कुठेही सावली दिसत नव्हती, त्यामुळे मानसिक थकवा जाणवायला लागला होता, कुठेतरी बसुन पोटापाण्याच्या प्रश्न सोडवायला हवा होता, त्यातच पुढच्या कोपऱ्यात ५ जणांचा गृप दिसला, त्यांची पोटपुजा उरकली होती, त्यानीपन बऱ्यापैकी सरपण गोळा केल होत, तोंड ओळख झाली ते पुढे मार्गस्थ झाले, आम्ही पोटोबाचा प्रश्न सोडवायला बसलो, बाकी अवयवाना पण थोडी विश्रांती दिली, पोटाचा कोठा पुर्ण करुन आम्हीपण त्यांच्या मागोमाग मार्गस्थ झालो, खिंडीतुन साल्हेर कडे मान वर करुन बघितल तरी पण त्याचा अवाका नजरेच्या टप्प्यात बसत नव्हता, खिंडीतुन जाताना साल्हेर ला उजवीकडे ठेवत सरळ पुढे जायच आणि काही अंतर चालत गेल्यावर "यु टर्ण" घेत पायऱ्या असलेल्या साल्हेर किल्ल्याकडे वळायच, वाट मळलेली असल्यामुळे चुकण्याचा प्रश्न येत नाही, पण पायऱ्या पूर्णपणे थकवुन सोडतात, एक एक पाय उचलत, हात टेकवत पहिल्या दरवाज्याच्या जवळ पोहोचलो,सकाळ पासून शोधात असलेली सावली भेटल्यामुळे एक प्रकारचे समाधान मिळाले, सोबतच बोनस म्हणुन गार वार्याचा झोत आला, शरीर सुखावल, मन टवटवीत झाल, थोडा आराम करून घरच्याना दाखविण्यासाठी काही पुरावे (फोटो) घेतले, आणि किल्ल्यावर मार्गस्थ झालो,
                          गडावर आल्यास डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळतात. पुढे थोडयाच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. पहिली उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यासमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. व हीच वाट आपल्याला पुढे सहा दरवाजे पार करून साल्हेरवाडीत उतरवते, तर मंदिरापासून वर चढत जाणारी दुसरी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. ही जागा मुकामासाठी योग्य आहे, इथे सर्व सामान उतरवून गंगासागर तलावात फ्रेश होण्यासाठी गेलो, तलावाच्या थंड पाण्याने हात-पाय धुतले, डोकं शांत केलं, एकदम ताज तवान झालो, आणी एक गंमत झाली, दृष्टीआड सृष्टी म्हणतात ना ते हेच ... एक कुटुंब किल्ला बघायला आलेलं, त्यांना या किल्ल्याबद्दल माहिती नसावी, त्यामुळे त्यांचा पाण्याचा साठा किल्ल्यावर येतानाच संपलेला, त्या कुटुंबात २-३ मुली होत्या, त्या पाण्यावाचून कासावीस होत होत्या, त्यांनी बरीच शोधाशोध करूनही त्यांना त्यांच्या मनासारखं पिण्याचं पाणी मिळालं नव्हतं, वैतागून त्या गंगासागर तलावाजवळ आल्या, कुटुंबप्रमुखाने आम्हाला पिण्याच्या पाण्याबद्दल विचारलं, मी त्यांना गंगासागर तलावाजवळच्या दोन टाक्याकडे बोट दाखवलं, त्या मुली पळतच गेल्या, पण ते पाणी बघून त्यांनी नाक मुरडत आमच्याकडे एक वेगळाच कटाक्ष टाकत बाजुला झाल्या, मग मीच त्यांना माझ्या सॅक मधली पाण्याची बॉटल दिली, त्यांनी हे बिसलेरी आहे का असं विचारलं, मी ही मनातल्या मनात हसत मान डोलावत हो म्हणालो, त्यांनी माझ्या दोन्ही बाटल्या रिकाम्या करून दिल्या, आणी  थँक्स  म्हणत सगळं कुटुंब मार्गस्थ झालं, पण गंमत अशी की, काही वेळापूर्वीच मी त्या दोन्ही बाटल्या त्याच गंगासागर तलावाच्या शेजारील टाक्यातुन भरून घेतलेल्या ज्या तलावाला त्या मुलींनी नाक मुरडली होती, नंतर बराच वेळ मी आणि DJ हसत होतो,
                    असो तर आम्ही पुन्हा गुहेत जाऊन चांगली दोन तास झोप काढली, साधारण ५ च्या आसपास जाग आली, तोपर्यंत इतर ग्रुप ची मंडळी चक्क आंघोळ करून आलेली, व इतर काही पब्लीक परतीच्या प्रवासास लागलेलं, ते सर्व बघत आपली बॅग घेतली तीन गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले आणी  गंगासागर तलावाजवळ आलो, काही आधीच्या ट्रेकर मंडळींनी चूल करून ठेवलेली, त्यामुळे छोटा संसार मांडला कडक कॉफी केली व डिनरची तयारी चालू केली, सोबतच उद्याच नियोजन करत होतो, "सालोटा" कसा, कुठून याचा अंदाज घेत होतो, तितक्यात १२-१५ वयोगटातील ५-६ मुले दिसली, त्यांना जवळ बोलावुन कुठले, काय, कसे याची थोडी चौकशी केली, आणि त्यातील दोघांना उद्या सकाळी ९ वाजता खिंडीत भेटायचं व आम्हाला सालोटा वर घेऊन जायचं मान्य केलं, योग्य मानधनामुळे ती मूलपण खुश झाली, त्यांना मार्गस्थ करून आम्ही मस्त मसाले भात, मसाला पापड आणी इत्तर गोष्टीची मेजवानी करून ९ वाजता पुन्हा गुहेत आलो, सकाळी किल्ला चढताना भेटलेला ग्रुप आपले सगळे सामान अस्थव्यस्थ पसरून "मिक्स भाजी व भात" ची मेजवानी बनवत होता, त्यांनी गुहेतच केलेल्या चुलीमुळे संपूर्ण गुहा धुराने माखलेली होती, काही काळ आम्ही बाहेरच बसलो, त्यांना सोबत घेऊन गुहेच्या तोंडाशी शेकोटी केली, त्या ग्रुप चा म्होरक्या सोडला तर इतर सर्व मंडळी आमच्या सोबत शेकोटी भोवती गोलाकार बसली, म्हंटल रात्री मस्त गप्पा टप्पा होतील, पण थोड्याच वेळात त्यांचा रंग दिसू लागला, त्यांनी सोबत रंगीबेरंगी बाटल्या आणलेल्या होत्या, माझी आणी DJ ची नजरानजर झाली आणी आम्ही झोप आली म्हणून तिथून सटकलो आणि गपचुप गुहेत जाऊन अंथरुणावर पडलो, ते ७-८ जण होते, त्यांना बोलून काही फायदा नव्हता, तासाभरातच त्यांचं जेवण उरकून रंगीत पार्टी चालू झाली ते थेट रात्री २ वाजेपर्यंत, आम्ही कानात हेडफोन टाकले आणि जुनी गाणी, गझल ऐकत झोपेच्या अधीन झालो,
                सकाळी ५ ला जागे होऊन गुहेच्या बाहेर आलो, गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडमाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग आहे. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्‍या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा - सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.पहाटेच्या घुक्यातली मजा अनुभवली, काही फोटोबिटो काढले आणि सालोटा ला जायचं म्हणून लवकरच गुहेजवळ आलो, सॅक उचलल्या आणि पुन्हा गंगासागर तलावाजवळ येऊन थोडा नाश्ता केला,

(क्रमश:)....

Sunday, 20 August 2017

चला...... साताऱ्याला !!!! (भाग - २)

रोजच्या रहाटगाडग्याने पिंजुन निघालेला माणुस एकदा का इरेला पेटला कि कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यातुन बाहेर पडतो, आणि स्वत:च्या जगात, स्वातंत्र्य अनुभवयास निघतो ना ....... बस...... तसच काहीतरी झाल.
         काहीही प्लॅन न करता गाडीला चावी लावली, आणि रस्ता मिळेल तिकडे हॅंडेल फिरवु लागलो, पहाटेच्या मंद पण बोचणार्या थंडीत बाहेरुनच प्रती बालाजीच दर्शन घेतल आणि ५ मिनिटांत NH-4 ला लागलो, गाडी साताऱ्याकडे आगेकुच करीत होती, मी मागे बसुन गुगल मॅप  धुंडाळीत होतोच, तेवढ्यात मॅप वाली बाई बोल्ली, on 400 mtr, plz right tern to Bhor road, streat drive to 12 km. बस्स आम्हाला तेच पाहीजे होत, रोहीडा किल्ला फक्त १६ किमी होता, घड्याळात बघीतल, पहाटेचे ५:१६ झालेले, DJ ला बोल्लो, भाई तु गाडी भगा, अपनेको " सूर्योदय" किल्ले पे जाकेच देखणेका, मग काय, खड्ड्या खुड्ड्यातुन गाडी आदळत आपटत, भोर मार्गे रोहीडा गाठलाच, पायथ्याला पोहोचल्यावर धुक्यामुळे नक्की किल्ला कुठे आहे हे काही उमजेना, त्यातच ५-१० मिनिटे गेली, किल्यावरचा सूर्योदय बघायला मन आतुर झालेल, पण किल्ल्याची दिशा कळेना, लांबुनच एक काका येताना दिसले, रस्त्यावर मधोमध थांबुन त्याना अडचण सांगितली, त्यांनीपण वेळ न दवडता रस्ता दावलाच, शेजारील प्राथमिक + माध्यमिक शाळेच्या पटांगणात गाडी लावा, आणि शाळेच्या पाण्याच्या टाकीला लागुन असलेल्या, मळलेल्या पायवाटेने सरळ जावा, तासाभरात तुम्ही गोरक्षनाथ मंदिर समोर पोहचाल, तोच किल्ल्याचा माथा, मी धन्यवाद काका म्हणेपर्यंत DJ ने गाडी पार्किंग केलीसुद्धा, मीच मागे होतो, मीही मग पटापट पाउले उचलत DJ च्या मागे निघालो, २० एक मिनिटांत आम्ही निम्मा रस्ता तर पार केला, पण नेहमीप्रमाने पहिल्या किल्ल्याच्या चढाईचा त्रास होतो तो झालाच, थोडी विश्रांती घेवुन पुढचा रस्ता पकडला, निम्यातुन चढण अंगावर असल्याने अपेक्षीत वेग मंदावला, त्यातच मला मागुन एक व्यक्ती किल्ला चढताना दिसत होती, बऱ्यापैकी धुके असल्यामुळे कोन ते स्पष्ट होत नव्हत, पण त्या व्यक्तीच्या चालण्याच्या वेग बघता ती कोणी ट्रेकर नसुन पायथ्याशी असलेल्या गावातीलच कोणी असावी असा अंदाज बांधला, मी थोडा सावकाश चालू लागलो, २-३ मिनिटांतच ती व्यक्ती नजरेच्या टप्प्यात आली आणि माझा अंदाज खर ठरला, साधी नाइट पॅंट आणि कुठल्यातरी राजकीय पक्षाचा मळलेला टि-शर्ट घातलेला २०-२५ च्या दरम्यानचा एक युवक, जवळ येताच त्यानेच स्वत:हुन विचारपूस चालु केली, कोण, कुठले, कसे आलात, कुठुन आलात अश्या प्राथमिक चौकश्या करुन झाल्या, व त्याने स्वत: बद्दल सांगण्यास सुरुवात केली, "म्या चंद्रकांत, हितच पायथ्याला रहातो, किल्ल्याच काम चालु आहे,  काल गडबडीत लहान कुलुप लावलय, आता जावुन मोठ कुलुप लावायचय," आम्ही म्हंटलं का बर सध्या काम बंद आहे का ? नाय काम चालुच आहे, पण आज आमच्या कड गणपतीच इसर्जण आहे, म्हणून आज्च्याला काम बंद ..... मनात एक प्रश्न आला, याच्या घरच्या गणपतीच विसर्जण म्हनुन बाकीचे लोक का येणार नाही कामावर, एक गाव एक गणपती म्हनाव तर येतानाच दोन - तीन सार्वजनिक मंडळ दिसलेली, आणि आता तर पाच - सहा ठिकाणावरुन झिंगाट नायतर शांताबाई ऐकु येतीये, कोड सुटेना, म्हनुन चंद्रकांतलाच याच उत्तर विचारल, त्याला जरा हसु आलच, ते आवरत तो बोल्ला, पाव्हणं कस हाय, आमच्याकड गणपती लई बसत्यात, पण काही वर्षापासून आमच्या सरपंचान एक भारी पध्दत सुरु केलीया, सगळ्या गणपतीच इसर्जण एकाच दिवशी एकाच वेळेला आण एकाच लायणीत करयच, चंद्रकांत ने उत्तर दिल खर पण पुन्हा नवीन प्रश्न .. यात नवीन काय आहे, आपल्याकडे पण असच असत कि, शेवटच्या दिवशी मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती पासुन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पर्यंत एकाच दिवशी एकाच लायनीत होत की हे सगळ, हा विचार करे पर्यंत किल्याच्या महाद्वार पर्यंत आलो सुद्धा, या प्रवेशद्वार वर गणेशपट्टी व महिराब आहे, दोनच मिनिटे थांबलो, आणि अपेक्षीत असे सुर्यनारायण दिसले, त्यांच ते पहाटेच्या दवामधल तांबड लोभस रुप पाहत तिथेच उभे राहिलो, त्यानीपण आमच्या अंगावर कोवळी सोनेरी किरणे टाकुन आमच्यावर लक्ष आहे हे दाखवुन दिले, मन प्रसन्न झाल,  "यासाठीच केला होता हा अट्टाहास" अस DJ  काहीतरी पुटपुटला, तोपर्यंत चंद्रकांत ने महादरवाजा ची कडी उघडली आणि आम्ही आत गेलो, एकात एक असे तीन भक्कम दरवाजे असणारा हा किल्ला, सर्व दरवाजे व त्याच्या जवळची अजुनही भक्कम असलेली तटबंदी पाहुन किल्ल्याबद्दलची उत्सुकता अजुनच ताणली गेली, दुसऱ्या दरवाज्याच्या आत एक मोठ पाण्याच टाक आहे, यातील पाणी बाराही महीने पुरते, ते बघुन काही पायऱ्या चढुन गेलो,  आत जाताच डाव्या बाजुला थोडस चालत गेलो, समोरच गोरक्षनाथ महाराज चे मंदिर दिसले, मंदिराचे दगडी बांधकाम असुन बाहेरील बाजुने  पत्र्याचे शेड आहे, त्याच मंदिराला कुलुप लावण्यासाठी चंद्रकांत आलेला, त्याने लहान कुलुप काढले, आणि म्हनाला तुम्ही दर्शन घ्या मगच मी मोठ कुलुप लावुन खाली जातो, आम्ही मंदिरातलच तेल आणि वात वापरुन दिवा लावला, महाराजाना वंदन केल, मंदिरातील इतर वस्तु बघत होतो, एका बाजुला किल्ल्याच्या डागडुजीसाठी लागणार साहित्य होत, तर दुसऱ्या बाजुला महाराजांची पालखी व इतर मंदिराच साहित्य होत, गोरक्षनाथ महाराजांच्या फोटो शेजारी लाकडातील एक सुबक अशी गणेश मुर्ती होती, ती न्याहाळत असतानाच चंद्रकांत ने छोटी पिशवी माझ्या हातावर ठेवली, तीच्या आकारमानवरुन वजनाच्या अंदाजापेक्षा वजन जरा जास्तच होत, उत्सुक्तेपोटी पिशवी उघडली, त्यात काही जुनी नाणी व इतर काही वस्तु होत्या, एक एक करत सर्व वस्तुबद्दलची माहीती चंद्रकांत ने दिली त्या पिशवीत मुस्लीम राजवटी पासुन ते मराठ्याच्या अगदी शेवटच्या काळात वापरात आलेली सर्व नाणी होती, सोबतच किल्ला बांधणी करताना वापरण्यात येणारे शिसे चा तुकडा होता, (हे मी पहिल्यांदाच बघीतले) तसेच अगदी सुरुवातीच्या काळातला एक तोफेचा गोळा होता, आकाराने सफरचंद एव्हधा असला तरी वजणाला चांगलाच होता, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळातल्या बंदुकीच्या गोळ्या होत्या त्याही आकारमाना प्रमाणे वजनाला जडच होत्या, अश्या नानाविध वस्तु बघुन काहीकाळ भूतकाळात गेल्यासारखे भासले, हे सर्व बघुन मंदिरच्या बाहेर पडलो, चंद्रकांत ने कुलुप लावत लावत किल्ल्याबद्दलची सर्व माहीती दिली, व तो आल्या वाटेने परतीच्या प्रवासास मार्गस्थ झाला, किल्ला बघुन खाली येताना मुख्य प्रवेशद्वार आठवणीने लावुन या अस बजावुन गेला, (त्याच्या बोलण्यात राजे विषयीचा आदर व किल्ल्याबद्दलच प्रेम जाणवल)  क्रमश ....

Tuesday, 25 July 2017

रायगड : माहेरघर, एक प्रेरणास्थान

नगारखान्यात नगारा वाजतोय रायगडी आवाज घुमतोय
गनिमांचा उडवूनि फज्जा माझा राजा सिंहासनी बसतोय

             या वर्षीची माझी आणी अनिल ची तिसरी फेरी, या वेळेला दोन नवीन मावळे तयार झाले, दोन बाईक्स, चार शिलेदार, असा बाणा सोमवारी ५ जून रोजी पुण्यातून पहाटे ४ वाजता नाशिक फाटा मार्गे रायगडास निघाला, ताम्हिणी घाटातला निसर्ग अनुभवत, सेल्फीकाढत, घाट संपल्यानंतर MIDC मध्ये वळताना कोपऱ्यावरच्या मावशींचा नेहमीचा चहाची चव घेत सकाळी निवांत ९ वाजता नेहमीप्रमाणे रायगड पायथ्यास बाईक्स पार्किंग केल्या, वाटेत रायगडाच्या अलीकडे एका वस्तीवर पोटभर "डोंगराची मैना" खाल्यामुळे, पोटात थोडीच जागा होती, तरीही एक-एक मिसळ संपवली आणी आपले बिर्हाड पाठीवर घेवून मनोमन राजांना मुजरा करून चढाईस सुरुवात केली, 

होईल तूमच्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा ...!!
तूमच्या भेटीसाठी राजे रायगडाकडं लागला डोळा ...!!
थाट हिंदवी स्वराज्याचा, श्री शिवराज्याभिषेक सोहळा ...!!
शत् जन्मीचे उपकार तूजं, मी साधा धारकरी मावळा ...!!

 "तुमच आमच नात काय, जय जिजाऊ, जय शिवराय"

              अश्या घोषणा देत, सोबतच्या नव्या मावळ्यांना जमेल तशी किल्याची-इतिहासाची माहिती देत रमत-गमत ११.३० च्या दरम्यान महादारावाज्यात प्रवेश केला, सकाळ पासूनच रायगड गर्दीने भरत होता, अनेक मावळे उत्साहात दाखल होत होते, थोडी विश्रांती घेतली, आणी हत्ती तलावाजवळून निघालो, हलक्याशा पावसाने आमचे स्वागत केले, सगळा थकवा क्षणात दूर झाला, अन्नछत्र मधून गरम गरम भात वरून सांबर याचा आस्वाद घेतला, आणी बाजारपेठेकडे आगेकूच केली, योग्य जागा बघून एका गाळ्यात तंबू लावला, पाठीवरच बिर्हाड उतरवल, आणी जरा ताणून दिली,

दुपारी २ च्या पुढे आवराआवर करून समग्र रायगड दर्शनास निघालो, सोबतच्या नवीन मावळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणी आनंद ओसंडून वाहत होता, सोबतीला आमसुलचा सरबत होताच, (सरबतापेक्षा त्यासोबत मिळणारे आमसूल फळ हे अतिशय छान लागते)

संध्याकाळी रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडताच होळीच्या माळावरच्या कार्यक्रमास सुरुवात होतीये याचा आवाज यायला लागला होता, लगबगीने तिकडे पोहचतच होतो, ढोल-ताशांचा आवाज जरा कुठे घुमायला लागलाच होता तेव्हढ्यात पावसाने एक जोरदार सलामी दिली,

आमच्या सोबतच इतरकाही मावळ्यांची पांगापांग झाली, पण ती क्षणिक, काही मिनिटातच सगळे मावळे लगेचच होळीच्या माळावर जमले, ताशाची तर्रर्र्र्र तरी, ढोलाचा निनाद, मावळ्याच्या घोषणा, सोबतच पावसाची साथ, वा...... सुंदर मिलाफ जमून आला, आणी सर्व मावळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं, ढोलच्या तालावर नाद पकडून सगळे पावसांत डोलत होते, मग एकापाठोपाठ मर्दानी खेळ सुरु झाले, दांडपट्टा, तलवारबाजी, भाले, काठ्या, लेझीम, असे नानाविध प्रकार बघत होतो,

काही वेळातच  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती सोबतच काही प्रमुख पाहुणे मंडळींचे आगमन झाले, त्यात एक ताई नेहमीप्रमाणे घोड्यावर बसून रायगड चढून आली, सगळे तिचे कौतुक करीत तिच्यासोबत फोटो घेण्यासाठी पळाले, आम्ही गर्दीत न जाता मोबाईललाच त्रास दिला, सोबतच रायगड पूजन, शस्र पूजन, झाले, आणी नगारखान्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली, आम्ही आत गर्दीत न जाता होळीच्या माळावर लावलेल्या स्क्रीनवरच या कार्यक्रमाचा आनंद घेतला, उत्साह म्हणतात ते असा, एक साधारण ७-८ वर्षाचा मुलगा सफेद कुडता, फेटा, कोल्हापुरी चप्पल घालून हातात लहानशी तलवार घेऊन संपूर्ण रायगड किल्ला फिरत होता, त्याची चालण्याची ऐट, त्याचा थाट म्हणजे, बस बघतच राहिलो, त्याच्या फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण जमल नाही, असो, डोळ्यांनी आनंद घेतला, आणी पुन्हा अन्नछत्र कडे निघालो, मस्त मसाले भाताचा सुगंध दरवळत होता, तीन प्लेट मध्ये चौघांनी याछेथ ताव मारला, आणी बाजारपेठेत आलो, तंबूबाहेर निवांत गप्पा मारत बसलो, घराच्या घड्याळाप्रमाणे रात्री १० वाजता पोटातील कावळ्याने आवाज दिला, आणी पुन्हा मोर्चा रायरेश्वर मंदिराजवळच्या दादांकडे वळवला, कांद्याच बेसन, चटणी आणी तांदळाची भाकरी, सोबतच कांदा आणी आम्ही आणलेली घरची शेंगदाण्याची चटणी, कावळ्याची ओरड शांत झाली, दादांकडची चटणी आणी घराची शेंगदाणा मिरची एकदम खाल्यामुळे मीनल च्या नाका-तोंडातून पाणी आले, कशीबशी जेवली बिचारी, एव्हाना वातावरण कुंद झाले होते, थंडगार हवा, ढगाळ वातावरण, आणी सगळीकडे दाट धुके पसरलेले, ५-१० फुटांपेक्षा लांबचे दिसत नव्हते, रमत-गमत सावकाश या सगळ्याचा आनंद घेत तंबू जवळ येवून बसलो, होळीच्या माळावर नजर टाकली, दिसन तर काहीच नव्हते, फक्त जागरण गोंधळचा आवाज येत होता, देवेंद्र गड चढून-चालून थकला होता, त्यामुळे अनिल आणी देवेंद्र ने झोपायचा निर्णय घेतला, ते तंबूत आडवे झाले
              सकाळी तसं लवकरच उठलो, फ्रेश होवून मुख्य कार्यक्रमाकडे निघालो, परत बाजारपेठेत यायचं नव्हत म्हणून सगळा पसारा आवरला, तंबू सोडला, आणी बिर्हाड पाठीवर टाकल,

रायारेश्वरच दर्शन घेतलं आणी मुख्य राज्याभिषेक कार्यक्रमासाठी नगारखान्यात आलो, अहो घराच्या कार्यक्रमाला सुद्धा एव्हढ तयार होणार नाहेत, एव्हढ स्वत: तयार होवून आलेले,  प्रत्येकजन सफेद सदराच काय, भारदार शेरवानी काय, उच्च प्रतीचे फेटे, कोल्हापुरी चप्पला, आणी तलवार, काय तो थाट, काय तो उत्साह, मन अगदी उत्साहित झाल, नगारखान्याच्या दाराजवळ, ढोलपथकाच अतिशय उत्साहात वादन चालु होत, त्यांना सर्वजण साथ देत होते, एव्हाना नगारखाना तुडुंब भरला होता,आत बसायला तर सोडा, घुसायलासुद्धा जागा नव्हती, सगळीकडे केशरी फेटे, ध्वज पताका दिसत होत्या, स्टेजवरील निवेदकाने, फक्त "छत्रपती शिवाजी महाराज कि....." म्हणायचा अवकाश, संपूर्ण नगारखाना व किल्ला परिसरातून एकच "जय" चा आवाज घुमायचा, अंगावर काटाच यायचा, एव्हाना प्रमुख पाहुणे, आयोजक यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती,


गर्दीतून पुढे जाऊन मेघडंबरी चा एखादा फोटो घ्यायची खूप इच्छा होती, पण ती अपूर्णच राहिली, नगारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या राजांचे निवासस्थान, राणीवसा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, अश्या अनेक वास्तु बघितल्या, आणि परतीच्या प्रवासास निघावं लागत, (एक घरगुती दुख:द अडचण आली) जवळच पडलेली रिकामी पोती उचलली, जमेल तसं कचरा त्या पोत्यात कोंबून कोंबून भरला, आणी परत होळीच्या माळावर आलो, काही क्षण स्क्रीनवरून या सोहळ्याचा आनंद घेतला, राजांना मनोमन वंदन केल, आणी टकमक टोकाकडे मोर्चा वळविला, वाटेत रिकाम्या पाण्याच्या बाटल्याने पिशव्या भरत आलेल्या, त्या व्यवस्थित बांधल्या आणी टकमक टोकावर पोहोचलो, टकमक टोकावरचा बेभान वारा आज का कुणासठावुक पण शांत होता, मन पण थोड उदास झाल, उगीच दोनचार सेल्फी काढल्या, आणी मध्यल्या रस्त्याने महादारावाज्याजवळ पोहोचलो,रायगड चढताना किंवा रायगडावर वावरताना जी शिस्त दिसत होती, ती लगेचच गायब, आरडओरड, धक्काबुक्की, सगळ्यांना गड उतरायची घाई, लहानगे बघायचे नाहीत, की महिला मुली बघायच्या नाहीत, फक्त आसुरी आनंद, सगळ्या कार्यक्रमाचा आनंद क्षणात गायब, हे सगळ असच करायचं असत तर गड किल्ल्यांवर येतातच का हि नालायक मंडळी, कितीही सांगा, सांगणार्याचा घसा कोरडा आणी यांच पालथ्या घड्यावर पाणी, काही स्वयंसेवक, पोलीस मित्र ओरडून सांगत होते, पण ऐकेल ती ही कार्टी कुठली, अथक परिश्रमातून किळसवाण्या वागण्यातून ३ तासांनी गड उतरलो, बाईक्स ला चावी दिली, आणी पहिला आवाज कानी घुमला, ए परश्या ....... आर्ची आलीय आर्ची, संपल सगलं,
                      उतरताना घेतलेले आंबे, कोल्ड्रिंक्स ची एक बाटली घेतली आणी निजामपूर गाठलं, पोटपूजा केली आणी, ताम्हिणी घाटातून गप्पा मारत, गाणी ऐकत, म्हणत, सेल्फी काढत, आणी उद्यापासून सुरु होणाऱ्या रुटीन आयुष्याची गणित मांडत संध्याकाळी घरात प्रवेश केला.

Friday, 28 April 2017

पुणेरी अभिष्टचिंतन

उगवत्या वाघोली तल उगवलेल व्यक्तिमत्व

🎉😂🎉😂🎉😂🎉😂

प्रोडीजी स्कूल मधला लाडका पप्प्या

😱😯😱😯😱😯😱😯


बी. जे. एस. कॉलेज मधला चॉकलेटी बॉय

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

संपुर्ण गाडे वस्ती (बकोरी फाटा) मध्ये SGS या ब्रॅंड ने प्रसिद्ध असलेला

🍾🍸🍾🍸🍾🍸🍾🍸

फेसबुकवर लाईक मध्ये लंबी रेस का घोडा

🏆🎽🏆🎽🏆🎽🏆🎽

प्रत्येक फोटो मध्ये कोणालाही टॅग करुन उगीचच प्रसिद्धी मिळवणारा

⚔⛓⚔⛓⚔⛓⚔⛓

कुठेही होउदे राडा, पहिला तिथुन पळ काढा अस म्हणनारा

💞⚜💞⚜💞⚜💞⚜

शहा परिवारातला एक(मेव) हिरा

🔍📍🔍📍🔍📍🔍📍

म्हणजेच शॉबी सरकार याना वयाची सतरा वर्ष पुर्ततादिनाबद्दल हार्दिक अभिनंदन...

👏🏻👑👏🏻👑👏🏻👑👏🏻👑
शुभेछुक :-
समस्त वाघोलीकर टाक फोटो करतो लाईक संघटना,
अखिल भारतीय १०० पोरांची आणि सत्ता मित्रांची गृप,
पै. शुभमभाऊ शहा मित्रमंडळ,


*****************************************************************************




⁠⁠⁠⁠⁠💖गेली अनेक दशके संपुर्ण केंदुर परिवाराची यशस्वी धुरा सांभाळणारी,

💖भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे "केंदुर" परिवारातल पहिला प्रेमविवाह करण्याचा मान मिळवणारी सोबतच तो वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी जाहिर पाठिंबा देणारी,

💖शेंगाच्या पोत्यातुन "पहेले प्यार कि पहीली चिठ्ठी" पाठविणारी,

💖स्वत:च्या आईला वशिला लावुन दादा सोबत रोटी कपडा और मकान पिच्चर बघणारी,

💖दिवसातुन चार टाईम मिस्त्री लावणारी सोबतच सर्व बहीणीना सवय लावणारी,

💖पुर्वीच्या KEM हॉस्पिटल वर विश्वास ठेवणारी,

💖लग्नानंतर सासर्याकडुन सर्व धार्मिक शिक्षण घेणारी,

💖आजही न चुकता रोज देवपुजा करणारी,

💖पत्त्यांचे सर्व डाव खेळण्यात पटाईत असणारी,

💖फरसाण आणी खाकरा एवढेच जेवणारी तरीही मेडिकलच्या गोळ्या हेच जेवण माननारी,

💖स्वत:च्या मुलांपेक्षा आम्हा नातवांवर सर्वाधिक जास्त प्रेम करणारी,

💖सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत फक्त मराठी मालिका बघणारी,

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

अशी कर्तव्यदक्ष, निर्णयतत्पर केंदुर परिवार मधील लाडकी आई तसेच चाकण परिवारातील फई म्हणजेच श्रीमती प्रभावतीबेन बाबुलालजी शहा यांना वयाच्या ८३ वर्षपुर्ती दिनानिमित्त व पुढील १२२ वर्षपुर्तीदिनाच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

😆😂   शुभेछुक   😂😆

🎗चाकणकर घे डबी लाव मिस्त्री महिला मंडळ,

🎗अखिल भारतीय बाबुलालजी फरसाण सेंटर,

🎗समस्त नातवंड - पतवंड (बावळट) संघटना,

(महत्वाची सुचना : फोन करुन अथवा जमल्यास प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या तरच संध्याकाळच्या पार्टिला आमंत्रण मिळेल.)

*************************************
**************************************

**************************************

💥माँ ची लाडकी नात, 💥डॅडी ची आवडती मुलगी, 💥न्यु इंग्लिश स्कुल कामेरीची कायमची टॉपर विद्यार्थिनी, 💥सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असणारी , 💥बालपणापासूनच अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारी, 💥अजितानाथ जैन ग्रुप ची आधार स्तंभ, 💥काकांची आक्का, 💥आमची माऊ(शी), 💥चाकण परिवाराची लक्ष्मी, 💥CFR परिवाराची दिदी, 💥साक्षात अन्नपूर्णा, म्हणजेच *श्रीमती साधानाबेन किरणभाई शहा* यांना वाढदिवसाच्या, खोबऱ्याची बर्फी, सर्व प्रकारचे लाडू चिवडा देऊन 12,000 ,लीटर पेट्रोल डिझेल चे टँकर भरून शुभेच्छा


शुभेछुक ....... 🙏
🥊 अखिल भारतीय इस्लामपूर *अग ए दीदी* महिला मंडळ 
🥊 चिकणी सुपारी मित्र मंडळ
🥊 आली इस्लामपूरला घेतली साडी संघटना

*†**************************

🔍*शिवाजीनगरच* उंचपुर नेतृत्व, 💥 *फटाक्याला* उगाचच घाबरणारी आणि *केंदुरला* 🏃🏻‍♀पळ काढणारी, *दहावीच्या* रिझल्ट ला *जोतिष्याचं* 🤐भविष्य खोट ठरवून त्यालाच धंद्याला लावणारी, *BMCC* मध्ये लेक्चर बंक करून *दिपा* सोबत कँटीन कट्टा 🍿गाजवण्यात पटाईत असलेली, मधल्या पट्टीत उभ्या असलेल्या *रेल्वेमधून* 🚃शिडी लावून उतरायचं असत असा *जागतिक शोध* लावणारी *शात्रज्ञ* स्वतःवर जोक करण्यास इतरांना प्रोत्साहन देऊन *समस्त ग्रामस्तांच* 🙈मनोरंजन करणारी,  *तमे मनं क्यारेच कई केताच नथी* हे ब्रीद वाक्य जपणारी, कायम *_मार्मिक_* 🙊बोलणारी, पैंज लावून *झोपेची गोळी* खाणारी, *लपाछपी* खेळताना *झोपा* 😴काढणारी, *मामाच्या* घरी शेजाऱ्यांच्या नळावरील पाणी *भांडून*🤼‍♂ आणण्यात पटाईत असलेली, लग्नानंतर *चार बंगल्याची*🚽 मालकीण, मामाच्या गाडीवर रडून रडून बसणारी, आवरलेलं *कपाट* पुन्हा आवरणारी, टापटिपपणा हे शाळेतील *मूल्यशिक्षण* जपणारी, अजितानाथ गरबा मंडळाची *बॅकस्टेज* 💃डान्सर, JIO च्या सिम वरून समस्त भावांना *मिसकॉल* देणारी, 

जिच्याबद्दल, लिहावं, बोलावं, सांगावं आणि ऐकावं तेव्हढं कमीच आहे अशी आपल्या सर्वांची *(मोठी)* आक्का म्हणजेच माननीय *मंगलाताई सुरेशराव शहा, संगमनेरकर* यांना जन्मदिनाच्या टोपल भर चकाना देऊन, पुणे ते संगमनेर चौका-चौकात लवंगी वाजवून, JiO  सिमचा बॅलन्स संपेपर्यंत शुभेच्छा.

शुभेछुक 
👻कु. गंगूताई मार्मिक बोलणारी संघटना,
👶🏻समस्त बंधु-भगिनी चिल्ड्रन मंडळ,
🚚मामाच्या गावाला जाऊया, १२ जण एका गाडीवर चक्कर मारुया ग्रुप.

Friday, 13 January 2017

भटकंती औरंगाबाद ची

सोमवार संध्याकाळ ची वेळ, ऑफिस च कामकाज आवरुन दुकानात रुजु होण्याची घाई, त्यातच फोन ने आवाज दिला, हॅल्लो ....... (पलिकडुन) कुठय रे ....... वर्कशॉप वर ये (फोन कट), या २ सेकंदाच्या फोन ने वीज चमकावी तस काहीस झाल आणि अनिल च्या डोक्यात शिजत असलेल्या भटकंती प्लान चा वास आला, लागलीच १० मिनिटात काम उरकुन वर्कशॉप वर दाखल झालो, अनिल ने एक भन्नाट प्लान समोऱ ठेवला, भटकंती हे आई नंतरचे पहील्या क्रमांकाच प्रेम असल्यामुळे नाही म्हणन्याचा प्रश्नच आला नाही, आषाढ महीन्यातील मंगळवार म्हणजे अनिल ची हक्काची सुट्टी, आणि बुधवार म्हणजे माझी हक्काची सुट्टी, असा दोघाना सुटेबल होणारा प्लान, दोन दिवस - ३ किल्ले - २ लेणी - (अंदाजे) १००० किमी ची बाईकिंग, सुरुवातीला कस - काय हे प्रश्न पडलेच, पण हिम्मते मर्दा, तो मदत दे खुदा अस म्हनतात ना, तसच काहीतरी झाल....... आमच्या अचानक ठरनार्या प्लान मुळे बाकी इतर मावळ्यांची नेहमीप्रमाणे नकारघंटा आली, ती पदरात पाडुन लागलीच घरी आलो, आणि आम्ही मोहीमेवर जानार असल्याची वार्ता दिली, घरातुन सुद्धा नेहमीप्रमाणे नकारघंटा वाजलीच, पण मागे हटतोय ते आम्ही कसले, काही शुल्लक गोष्टी सोडल्या तर बॅग अशीही भरलेलीच असते, ती उचलली आणी मोहीमेसाठी सज्ज झालो, अनिलराव त्यांचा घोडा (Yamaha Fezer 150) घेवुन हजर झाले, व सोमवारी रात्री ठीक ११:३० ला आमच्या मोहीमेची सुरुवात झाली, ठरलेल्या आराखड्याप्रमाने पहाटे ७ पर्यंत जंजाळा किल्ला च्या पायथ्याशी पोहोचणे अपेक्षीत होते, हा ट्रेक प्लान आम्हा दोघांचाच होता परंतु पावसाला पण आमच्यासोबतच ट्रेक ला यायच होत बहुदा, असो .....तर त्यालाही सोबत घेतल, यामुळे नेहमीप्रमाणे बाईक काही बुंगवता आली नाही, त्यातच आधीच्या दोन-तीन दिवसाच्या कामाच्या गाड्याने शरीर दमलेले असल्यामुळे डोळे झोपेच्या अधीन व्हा असे बजावत होते, जास्तीचा आगावुपणा नको म्हणुन हायवे च्या जवळपास एखादे मंदिर दिसते का ते बघितले पुढे - पाठीमागे १० किमी पर्यंत तरी अंग टाकण्यासाठी कोणतीही जागा नाही याचा अंदाज आला, मग मी एक नामी शक्कल लढवली व एका पेट्रोल पंपावर काही काळ अंग टाकुया असे सुचवले, लागलीच एक पेट्रोलपंप दिसला गाडी वळवली, व अंग टाकण्यासाठी नजरेनेच जागा शोधु लागलो, तिथे रात्रपाळी वर काम करणार्या कामगाराला प्रथम दर्शनी आम्ही चोर - लुटारु वाटलो म्हणुन त्याने त्याच्या इतर दोन सहकार्याना उठविले, बिचार्यांची झोप-मोड झाली, त्यानी येवुन आमची थोडी चौकशी केली, आम्ही आमचा उद्देश सांगितल्यावर त्यानी स्वत:हुन आम्हाला झोपायला जागा दिली, मग आम्ही पण १ ते १:३० तास ताणुन दिली, पुन्हा पहाटे ५:३० ला पुढचा प्रवास चालु केला, सरतेशेवटी आराखड्यानुसार खुपच उशीरा म्हणजे सकाळी ७ ला आम्ही औरंगाबाद ला पोहोचलो,

         ठरल्याप्रमाणे जालना रोड विचारत आम्ही मोंढा नाका चौकात आलो, बऱ्याच वेळापासुन प्रतिक्षेत असलेला टपरी वरचा वाफाळता चहा दिसला, लागलीच गाडी वळवली, सोबत आलेल्या पावसामुळे ठरलेल्या गोष्टींच गणित चुकायला लागल होत, त्यातच हा पाऊस थांबायची चिन्ह दिसत नव्हती म्हणुन ठरलेल्या आराखड्यात बदल केला जावा असा प्रस्ताव अनिलरावांकडुन आला, परिस्थितीचा अंदाज घेवुन वाफाळत्या चहा चा घोट घेत मी पण लागलीच होकार दिला, व दुसऱ्या दिवशीचा प्लान आज करायचे ठरले, आजुबाजुची इतर लोकांची चाललेली सकाळची कामाची गडबड, शेजारीच चाललेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे सायकलस्वार आणि पायी चालनार्या लोकांची कसरत, पावसात पण आपले काम चोख करणारा पेपरवाला, रिक्षा चालक-मालक यांची प्रवासीवाहतूक अशी अनेक दृश्य न्याहाळत हातातला चहा संपवला आणि गाडीला चावी दिली, खऱ्या अर्थाने ट्रेक ची सुरुवात झाली, तेथुन काही मिनिटांत भांगसाई गड येथे पोहोचलो, लांबुन किल्ला छोटा वाटत असला तरी पण स्थानिक लोकानी व भांगसाई देवीच्या भक्तान्नी पुर्ण गड पायऱ्या केल्यामुळे थोडी का होइना दमछाक होतेच, चढताना सुरुवातीच्या टप्प्यावर एक आश्रमशाळा आहे, त्याच्या वास्तुला डावीकडे ठेवत एका प्राचीन महादेव  मंदिर ला वळसा घालुन मुख्य पायऱ्या असलेल्या वाटेला लागतो, त्या महादेव मंदिराच्या जवळच त्या मंदिराचे नवीन लाल दगडातले बांधकाम चालु आहे, बांधकाम जरी नविन असले तरीपण त्याच्या बांधकामाच्या शैलीतुन ते भव्य व प्राचिनच आहे असे भासते, ते न्याहाळत आम्ही मुख्य वाटेला लागलो, रात्रभर प्रवास आणि सोबत पाऊस यामुळे अंगात बऱ्यापैकी थंडी मुरली होती, चढाई सोपीच होती पण थकवा जाणवत होता, रमत गमत निसर्गाचा आनद घेत अर्ध्या-पाऊण तासात गडावर पोहोचलो, भांगसी गड चढतांना गडमाथ्याच्या थोडं खाली उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायर्‍या संपून कातळात खोदलेल्या पूरातन पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशव्दाराची कमान मात्र उध्वस्त झालेली आहे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. प्रवेशव्दारातून गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर पूर्व - पश्चिम पसरलेला चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे. सुरुवातीला काही "सिझनेबल शॉपिंग मॉल" लागतात, त्यानंतर सिमेंट कॉंक्रिट मध्ये नुतनीकरण केलेल भांगसाई देवी च मंदिर, हे मंदिर तीन मजली आहे, आपल्या नजरेला दिसतो तो पहिला मजला, त्याखाली भुयारात मुख्य देवीची मुर्ती आहे, व त्याखाली ५-७ पायऱ्या उतरुन गेल की श्री दत्त ची मुर्ती आहे, व तेथुनच बाहेर पडायला मार्ग आहे, हा मार्ग पाण्यातुन जातो, हे सर्व बांधतानाचे नियोजन छान होते, पण श्री दत्त मंदिरातुन बाहेर पडतानाचे पाणी आज मितिस गटार सदृश्य आहे, कारण त्या पाण्यात मासे आहेत अस समजुन अनेक भाविक त्या पाण्यात ओल खोबर, मुरमुरे असे काहीबाही टाकत असतात, हे सर्व बघुन आल्या पावली परत तीन मजले चढून मुख्य मंदिरातुंच बाहेर पडलो, भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरड टाक आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला (दक्षिणेला) वळून खाली उतरावे. येथे गडाच्या दुसर्‍या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजा समोरच कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडी प्रमाणे होत असावा. आज या गुहांच्या वरचा दगड पडल्यामुळे या गुहा बुजलेल्या आहेत. हा दरवाजा पाहून परत गडमाथ्यावर यावे. पुढे गेल्यावर कातळात खोदलेले एक खिडकी टाक आहे. या टाक्यात मुळ आयताकार खोदलेल्या टाक्याच्या आत ४ चौकोनी खिडक्या (झरोके) कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेल शिवलिंग व नंदी आहे. या टाक्याच्या पुढे उजव्या हाताला (उत्तरेला) वळून खाली उतरावे. येथे कातळाच्या पोटात तीन दालन असलेल खांबटाक कोरलेल आहे. या टाक्या समोरील भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. हे टाक पाहून पुन्हा गडाच्या माथ्यावर येऊन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक जोड टाक पहायला मिळत. या टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. त्याला लागूनच एक कोरड पडलेलं टाक पहायला मिळत. या टाक्याच्या तळाला एक आयताकृती खड्डा कोरून काढलेला आहे. या टाक्याच्या जवळ एक बैठ घर बांधलेल आहे. येथून किल्ल्याचे पश्चिम टोक पाहून प्रवेशव्दाराकडे परत आलो, गडमाथा बघताना fb आणि whatsapp च्या DP ची व्यवस्था केली आणि परतीच्या प्रवासास लागलो, या गडाची देखरेख कोण करत त्याना गाठुन किमान ते गटार सदृश्य पाणि तरी बदला हो अस सांगायच होत, पण ते भेटलेच नाही, किंवा कोणी मोठे विश्वस्थ सुध्हा भेटले नाही, सरते शेवटी एका मुलाला हे सर्व सांगितले आणि तो आमचा निरोप त्या विश्वस्थ पर्यंत पोहोचवेल असे वचन घेवुन गडावरुन उतरलो, 

यानंतर मोर्चा देवगिरी (दौलताबाद) किल्ला कडे वळवला, हा किल्ला काही वर्षांपूर्वी शालेय शैक्षणिक सहली मध्ये बघितला असल्याने बऱ्यापैकी माहिती होता, त्यामुळे काही ठिकाणी फक्त नजर टाकली आणी लवकरात लवकर किल्ल्याच्या मुख्य भागाकडे निघालो, कारण या किल्याचा "भूलभुलैया मार्ग" मला खूप आवडतो, त्याकाळी सैनिक जीव मुठीत घेऊन जात असतील, पण आज ते सर्व आठवताना, आणी  तो भूलभुलैया मार्ग पार करताना मी त्या सैनिकांच्या जागी स्वतः ला ठेवतो, जाम भीती वाटते, अंधाऱ्या मार्गात पुष्कळ प्रमाणात वटवाघुळ आहेत, ती  कधी अंगावर येतील याचा काही नेम नाही, सध्या पाऊस पडून गेल्यामुळे त्या वटवाघुळांच्या विष्ठेचा खुपच कसातरी वास येत होता, वासाच्या वैतागाने त्या भुयारातून लवकर पळ  काढला आणी गणेश मंदिर जवळ पोहोचलो, काही क्षण विसावलो, जुन्या सहलीच्या आठवणींना मनातल्या मनात उजाळा दिला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आणी  मंदिराच्या बाहेर निघणार तितक्यात त्या मंदिराच्या पुजारी म्हणवणाऱ्या काकुंनी सरळ-सरळ दक्षिणाच मागितली राव.... ती पण अशी, (पोरांनो... २०-३० रुपये देऊन जावा या काकुला, देवाचे चांगले आशीर्वाद मिळतील) काय बोलावं सुचेना, सर्वच देवदेवतांनी आपल्या काही प्रतिष्ठित ठिकाणी अकाऊंटंट ठेवल्याचे सर्वश्रुत आहे, पण किल्ल्यावरच्या मंदिरात भेटलेल्या ह्या काकु पहिल्याच अकाउंटंट, असो, आम्ही काही दक्षिणा दिली नाही, उलट त्याच्याच निदर्शनास काही गोष्टी आणून दिल्या, हा किल्ला शहरापासून थोडा लांब असल्यामुळे या किल्ल्याचा पण सिंहगड, प्रतापगड झालाय, त्या मंदिराच्या मागेच भविष्यातील नवदाम्पत्य बसलं होत, त्यांना काकु करवी थोडी दमदाटी केली, आणी त्यांना तिथुन  हाकलले, पण खरंच त्यांना नसत हाकललं तर बर झाल असत अस नंतर वाटलं, कारण ते भविष्यातील नवदाम्पत्य आमच्या सोबतच "हातात हात" घालुन बारादरी इमारतीकडे चाललं होत, आमच्या पुढे-पाठीमागे एक ३०-३५ जणांचा ग्रुप होता ती सर्व मुले त्या कपल ला बघून जोरात ओरडत होत, आरं ए परश्या.........  आर्ची आलीया आर्ची....., याची थोडी गंमत पण वाटली आणी  थोडा राग पण आला, असो बारादरी च घुमटाकार छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी रूम आणी सज्जा बघत काही क्षण विसावलो, हलकी-फुलकी पोटपुजा  केली, हे करत असताना तिथे एक वयस्कर काका होते, बहुतेक ते तिथे केअरटेकर असावेत, त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये गवळणीची चाल असणार कसलातरी गाणं लावलेलं होत, शब्द मराठी नव्हते म्हणून ते काही कळलं नाही, पण चाल सुरेख होती, ऐकताना छान वाटलं म्हंटल पोट-पुजा उरकलीकी विचारू त्यांना पण तेवढ्यावेळात ते कुठे गायब झाले कोणास ठाऊक , इकडं तिकडं बघीतल पण ते काय दिसले नाहीत, चाल मनात बसली होती, ती  गुणगुणत बिजली दरवाजा आणी जनार्दन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले, आणी "काला  पहाड" तोफ न्याहाळत पुढे निघालो, समोरचा १०० पायऱ्या असणारा बुरुज चढून गेलो आणी सहलीच्या वेळी बघायची राहिलेली दुर्गा म्हणजेच "धुळधाण" तोफ जवळ पोहोचलो, खरंच या तोफेकडे बघीतले आणी समोरच्या दृष्टीस पडणाऱ्या किल्ल्याकडे बघीतले कि आपण अजिंक्य असल्यासारखे वाटते, इच्छा असूनही काही क्षण पाय तिथून निघाले नाहीत, काही क्षण तसाच बसून राहीलो, दूरवर पसरलेली "अंबारकोट"ची तटबंदी न्याहाळत काढता पाय घेतला, बुरुजाच्या १०० पायऱ्या उतारण्यापेक्षा पलीकडील बाजूने उडी मारून परतीच्या रस्त्याला लागता येईल म्हणून अनिल पाठोपाठ मीही उडी मारली, परंतु खाली निसरडे गवत होते, व उडी मारताना थोडा अंदाज चुकला, त्यामुळे पुढे महिनाभर (आधीच मोडलेल्या) डाव्या गुडघ्याने खूप त्रास दिला, असो, तुम्ही असे कोणतेही प्रयत्न करू नका ज्याने स्वतःला आणि किल्ल्याला दुखापत होईल, किल्ला उतरताना चाँद  मिनार च्या बाजूला असलेल्या काही पडलेल्या इमारतेचे अवशेष आहेत, काही हमामखाने आहेत, ते बघीतले त्यात एका इमारतीमध्ये काही तोफा, काही मुर्त्यापण आहेत, सोबत बागबगीच्या आहे, हे बघत काही फोटोसेशन केले, ते बघून किल्ल्याच्या बाहेर आलो, बाहेर ५-६ विक्रेते आम्हाला बाजूला घेऊन काही जुनी नाणी दाखवत होते, व त्यांची अव्वाच्या-सव्वा किंमत सांगत होते, सगळं पुराण ऐकून घेतलं त्यांना रामराम करत गाडीला चावी दिली.

               

क्रमश ......